Saturday, June 29, 2024

रामसेवक- राघवादित्य

  रामसेवक- राघवादित्य

Ramsevak



१) युद्धात ऐन वेळेस रामसेवकच ह्या भावंडांना सहाय्य करणार आहे.३/१४६

२) तो धर्मलेखेला म्हणतो,

ज्या कुळाला तू तुझे माहेर केले आहेस,त्याला

मी बट्टा लागू देणार नाही आणि तुझ्या 

माता-पित्यांनाही नाही.

३) धर्मलेखा रामसेवकाला म्हणते,

' तुमच्या सहाय्याशिवाय गेल्या ५२ वर्षांची वाटचाल खूपच कष्टाची झाली असती'

असे म्हणून  ती त्याला प्रणाम करून आशीर्वाद मागते.

४) फक्त एकट्या रामसेवकास ठाऊक होते की,

भागवतानंदांचा शब्द हीच विजयरुद्रांच्या 

मायानगरीत शिरण्याची व काहीही करण्याची गुरुकिल्ली होती.

५) युगानुयुगे विजयरुद्र व धर्मलेखा असेच जन्म घेतात- केवळ धर्मकार्यासाठी👈 हे राम सेवक नीट जाणतो.तसेच 'धर्मलेखा विजयरुद्रांच्या पक्षात आहे व विजय रुद्र धर्मलेखेच्या पक्षात आहेत ' -हे ही तोच नीट जाणतो.

६) ह्या रामसेवकाकडे अग्निबंधन विद्या आहे व जांबुवंताची गदा आहे ..३/१२८

७) रामसेवकाकडेच संपूर्ण भारतवर्षाचा इतिहास 

काटेकोरपणे लिहून ठेवलेला आहे.

८) हा रामसेवक प्राणहीन आहे तरीही जिवंत आहे.

९) हा दररोज एक घट्ट मृत असतो व एक घट्ट जिवंत आणि हे चक्र चालूच आहे.

१०) ह्याचे पंचप्राण वासुकीच्या प्रासादात जतन करून ठेवले आहेत.

११) ह्याचे मूळ नाव लेखाधर्म आहे.ह्याच्या उलट नाम धर्मलेखा.

१२)ब्रह्मसभेने धर्मलेखेची संपूर्ण जबाबदारी सदैव ह्याच्याकडेच सोपवली आहे.

१३) ह्याने  जे घडवून आणले ते पाराशर-संहिता व हनुमत्-विद्येचा विनियोग करून.

१४) हा जगणार की मरणार हे युद्धाच्या अंतीम दिवशी ठरणार आहे.कारण घृणातिशया व अहमहिका एकत्र येतील तेव्हा जो स्फोट घडेल तेव्हा ह्याचे जीवन संपू शकते.

१५)ह्याचे कार्य त्या लढाईच्या अंतिम क्षणाला

संपलेलेच असणार आहे, असे तो म्हणतो.

१६) ह्याचे रूप तंतोतंत धर्मलेखेसारखे आहे.व तो स्त्री रूप घेऊ शकतो.वाईट शक्ती स्वीकारू शकतो.व ह्याचे कर्तृत्व व प्रेम अतर्क्य आहे.

१७) ही एकमेव अशी व्यक्ती आहे की ज्याला आपल्या माता- पित्यांमधील सांकेतिक भाषा व लिपी समजते,जी इतर कुणालाही ठाऊक नाही.

१८) हा स्वतःपेक्षाही ,स्वतःच्या पत्नी अपत्यांपेक्षाही

अधिक प्रेम धर्मलेखेवर करतो.त्यांचे नातेच तसे विलक्षण, अद्भुत व पवित्रतम आहे.


Important Points from Aniruddha's Agralekh Discussion Group 

Tuesday, June 11, 2024

रसमाधुरीविद्या,इलाविद्या,इलाभंगविद्या व विजयमाधुरीविद्या

 सद्विद्या नं ८७ ते९०

रसमाधुरीविद्या,इलाविद्या,इलाभंगविद्या व
विजयमाधुरीविद्या
कथामंजिरी १४२

१) केशवादित्याला व रसमाधुरीदेवीला
इलादेवींनी रसमाधुरीविद्या शिकवली आहे.

२)विजयरुद्रांकडून रसमाधुरीदेवींनी तिच्या मातेवरील प्रेमासाठी इलाविद्या शिकून घेतली होती.

३) विजयरुद्रांनी ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांकडून  धर्मलेखेसाठी इलाविद्या शिकून घेतली होती.

४)परंतु धर्मलेखेने इलाविद्येच्या विरुद्ध असणारी
अशी इलाभंगविद्या स्वतःच्या पातिव्रत्यानेच सिद्ध करून ठेवली होती.

५) त्यामुळे विजयरुद्र व रसमाधुरी इलाविद्येचाच
‌काय, तर इलाविद्येबरोबर रसमाधुरीविद्येचाही
वापर करू शकणार नव्हते.

६) परंतु केशवादित्य एकटाच असा आहे की,
जो इलाविद्या शिकून झाल्यानंतर,तिच्यातच
प्रयोग करून इलाभंगविद्या निष्प्रभ करणारी
विजयमाधुरीविद्या तयार करू शकेल.

७) कारण इलादेवींनी एकट्या केशवादित्याला शिवशासनम् ग्रंथातील शेवटचे प्रकरण शिकविले आहे.

८) आणि हे अन्वयेलाही ठाऊक नाही की,इलाभंगविद्येचा भंग करण्यासाठी लागणारे पवित्र सहाय्य ,शिवशासनम् ग्रंथामधील त्या शेवटच्या प्रकरणात आहे.

९) आता प्रश्न उभा राहिला आहे कारण
केशवादित्य रसमाधुरीविद्या व्यवस्थित जाणतो;
परंतु  रसमाधुरीदेवींनी  त्याला इलाविद्या शिकवली नाही.कारण त्या त्यासाठी तयार नाहीत.

१०) विजयरूद्र धर्मलेखेला शपथबद्ध असल्यामुळे,
केशवादित्याला इलाविद्या शिकवू शकत नाही.

११)इलाविद्या केशवादित्यास  रसमाधुरीदेवी पण शिकवू शकत नाही व इलादेवीसुद्धा शिकवू शकत नाहीत कारण
अन्वयाच्या अनुभवावरून इलादेवी व रसमाधुरीदेवी एकमेकींच्या रूपात पाहिजे तेव्हा
वावरत असाव्यात.

१२) पण इलादेवींच्या रूपातील रसमाधुरीदेवी
केशवादित्याला इलाविद्या शिकवू शकतात.
असे अन्वयेला वाटते.

१३)म्हणून इलादेवींच्या रूपात, रंगेश्वरी गर्भगृहातून बाहेर आलेल्या रसमाधुरीदेवींकडून केशवादित्याने
**इलाविद्या* शिकून घेतली.

.१४) पण केशवादित्यास इलाभंगविद्येला निष्प्रभ
करणारी विजयमाधुरीविद्या तयार करावयाची होती.
व त्यासाठी त्याला धर्मलेखेची अशी गोष्ट हवी होती जिचा संबंध विजयरुद्रांशी असतो.

१५) केशवादित्यास विजयरुद्रांनी दोन वेळा
वृद्ध रूप घेऊन जाण्यास बजावले होते ते आठवताच त्यांच्या डोळ्यांसमोर धर्मलेखा उभी राहिली.आणि त्याला तिची स्वतःच्या हातातील मुद्रिका तिच्या नथीस लावून विजयरूद्रांचे स्मरण करण्याची सवय आठवली.

ही सवय धर्मलेखेच्या मायानगरीतील गुप्त कक्ष निष्प्रभ करतानाही केशवादित्याने पाहिली होती.

त्यानंतर त्याला आठवले की,इलादेवी
धर्मलेखेची मायानगरी बनल्या आहेत.

मग त्याला खात्री पटली की,नथ व मुद्रिका ह्यांच्या मध्येच इलाभंगविद्या असणार.

म्हणून तो व रसमाधुरीदेवी धर्मलेखेच्या आश्रमात गेले. तिथे धर्मलेखेच्या कपाटात त्यांना नथ व मुद्रिकेबरोबर त्या पेटीच्या तळावर इलाभंगविद्येचा
मंत्र धर्मलेखेच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेला दिसला.

१६) हे सर्व विजयरुद्रांना
सांगताच,  त्यांना धर्मलेखेने  प्रेमाने दिलेला वासुकी नागमणी आठवला.व तो त्यांनी आपल्या कंठकूपातून काढून केशवादित्याच्या मस्तकावरील केसात लपविला.

अशाप्रकारे केशवादित्यास इलाभंगविद्या निष्प्रभ करणारी विजयमाधुरीविद्या तयार करणे शक्य झाले.

वैश्विक इतिहास Vaishvik Itihas Family Tree

 


Agralekh mind map of 1192.
 TO READ THE PDF OF FAMILY TREES.


: It's now in pdf format. Click this text link.
After zooming in please wait for few Seconds to get clear picture .
Hari Om Shree Ram Ambadnya

Saturday, May 25, 2024

भगवान वासुकी

 

Vasuki Naglok explanation



भगवान वासुकी


भगवान शिवाच्या गळ्यात नित्य असणारा भगवान वासुकी म्हणजे , शिवाच्या ध्यानावस्थेत दक्ष असणारा त्याचा दास.


भगवान वासुकी हा शिवाचा दास्यभक्त आहे आणि त्याला अमृतमंथन करण्याचे सामर्थ्य आहे . 


भगवान वासुकी म्हणजे भगवती पार्वतीचे पातिव्रत्य आणि त्यासाठी तिने केलेला केलेला त्यानं ह्यांचे मूर्त स्वरूप.


प्रेम, व्रत व त्यागरूप असणारा वासुकी हा अज्ञानगंज चा खराखुरा अंतिम सत्ताधीश आहे . 


शिवाच्या गळ्यात असतानाच, पाताळलोकातील नागलोकाचा स्वामीही आहे व तेथेही निवास करतो.


भगवान वासुकी ची पत्नी शतशीर्षा ही शिव-पार्वतीच्या दयेचे स्वरूप आहे.


वासुकी भगिनी मनसादेवी ही शिव-पार्वतीच्या  असुरांवरील क्रोधाचे स्वरूप आहे .


Reference: Katha Manjiri 3-135, Article, written in Daily newspaper by Sadguru Aniruddha Bapu (Dr. Aniruddha Joshi) . Visit and register on www.tulsipatra.in to read Katha Manjiri Agralekh series.


Hari Om Shree Ram Ambadnya Naathsanvidh

Friday, April 12, 2024

शुभात्रेयी

 🌻शुभात्रेयी🌻


कथामंजिरी ३/११७ व तुलसीपत्र १४९८

ह्या अग्रलेखात ब्रह्मवादिनी शुभात्रेयींचा उल्लेख आला आहे.


याज्ञवल्क्य सांगतात,मंत्रगजर चोरणे म्हणजे

दत्तात्रेयभगिनी शुभात्रेयीदेवींच्या पादुका चोरणे.


ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे भगवान अत्रि व भगवती अनसूया ह्यांची कनिष्ठ कन्या अर्थात् भगवान दत्तात्रेयांची सख्खी धाकटी बहीण.


ही दत्तात्रेय भगिनी सदैव माता-पित्याबरोबर राहून त्यांची सेवा करीत असते.व हिलाच स्वतः अनसूयेने त्रिविक्रमाची उपासना देण्याची प्रथम दीक्षा

सत्ययुगातच दिलेली आहे- जेव्हा वेद लिहिले जात होते.भगवान त्रिविक्रमाच्या भक्तांची काळजी घेणे 

हाच तिचा निर्धार आहे.


हिचा त्रिविक्रम कसा आहे हे तिच्याच शब्दांत,

⬇️

ज्याच्या मस्तकी राहती श्रीदत्त।

जगदंबा करी निवास ज्याच्या हृदयचित्तात

हनुमंत स्वतः आहे ज्याचे हस्त

असा असे हा एकमेव अद्वितीय त्रिविक्रम दत्त प्रदत्त।


ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे त्रिविक्रमाची माता

श्रीविद्या हिचे मानवी स्वरूप आणि म्हणून

शुभात्रेयी ही त्रिविक्रमाची माताच.


हिने मंत्रगजर सर्व श्रद्धावानांसाठी खुला केला.

ह्या दत्तात्रेय भगिनीस अर्थातच मृत्यूचे बंधन नाही.

काळाचे बंधन नाही.


परंतु तिने  स्वतःचे सर्व‌ तपोबळ तिच्या पादुकामध्ये ठेवून दिले आहे.

केवळ एकाच गोष्टीसाठी - श्रद्धावानाकडे पुण्य जराही नसले,तरीदेखील त्याला मंत्रगजर करता यावा म्हणून.


ह्या तिच्या पादुका हिमालयातील एका गुप्त स्थानावर सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत.कारण त्रिगुणात्मक त्रैमूर्ति भगवान दत्तात्रेयांच्या रचनेनुसार

जोपर्यंत ह्या पादुका अशुद्ध जलात विसर्जित होणार नाहीत,तोपर्यंत हा महामंत्र, हा मंत्रगजर

श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ बलस्थान असेल व ते

बलस्थानच ह्या दुष्ट परंपरेला चोरावयाचे आहे.

Monday, April 8, 2024

संजीवनी विद्या

 

संजीवनी विद्या


ही संजीवनी विद्या महादुर्गेची शक्ती व त्रिविक्रमाची सिद्धी आहे.


ही विद्या फक्त शुक्राचार्यांच्याच ताब्यात राहिली.


ह्या विद्येवर बफोमेटलाच काय स्काली व अंकारालासुद्धा तिच्यावर ताबा मिळवता येणे

शक्य नाही.


शुक्राचार्यांच्या पहिल्या दोन्ही कन्या

दिती व दनु ह्या दोघींकडेही अल्प संजीवनी विद्या आहेच- खंडित अवयव नीट करण्यासाठी.


शुक्राचार्यांनी संजीवनीविद्येचा उपयोग करून वालीचे सहस्त्रार्जुनाने तोडलेले हात परत जोडून दिले होते.


शुक्राचार्यांकडे ही संजीवनी विद्या

किरातकालामध्ये ( किरातकाल ९) ब्रह्मर्षि वसिष्ठांच्या शापामुळे निष्क्रिय अवस्थेत होती.


Notes from - Aniruddha's Telegram Discussion Group


Thursday, April 4, 2024

Tarini Vidya

 सद्विद्या नं ४४

तारिणीविद्या

तुलसीपत्र १३२०

Tarini Vidya


श्रीचण्डिकाकुलाशी सर्व अहंकार सोडून फक्त
भाबड्या भक्तिभावाने आचरण करणे व मन
श्रीचण्डिकाकुलाविषयी निर्विकल्प करणे-
ही एकच गोष्ट अगदी सामान्यातल्या सामान्य मानवापासून महर्षिपर्यंत प्रत्येकाने आपापल्या
कुवतीनुसार करणे,
ही एकमेव तारकशक्ती आहे, तारिणीविद्या आहे अर्थात् पश्यंतीवाणी आहे.
तारिणीविद्या म्हणजे,
स्वतःच स्वतःला श्रीचण्डिकाकुलाचा नि:संशय
व अविभाज्य घटक मानणे.
कोण म्हणून?
तुमचा इष्टदेवताचा पुत्र म्हणून किंवा कन्या म्हणून,
तसेच एकमेव अद्वितीय असणाऱ्या त्रिविक्रमाला
एका स्तरावर 'पिता':दुसऱ्या स्तरावर 'मित्र' व 
तिसऱ्या स्तरावर ' आपले अंतिम साध्य व ध्येय' मानणे.

Compilation : Mohiniveera Kurhekar