Saturday 23 March 2024

# सिद्धयोगी #ज्ञानगंज

 # सिद्धयोगी

* प्रौढ, उमदा, देखणा राजपुरूष 

* चिदानंदचे तंतोतंत प्रौढ स्वरूप

* प्रापंचिक - विवाहित

* युवराज आकाशकुक्षचा अत्यंत जवळचा आप्त. त्याची माता ही सिद्धयोगीची ही माताच आहे.

* मातेने कानात सांगितलेल्या मंत्र गजरावर विश्वास

* पित्याने शुभ्र धवल घोडा ' राजन ' ( अनेक गुण व कौशल्य असलेला)  १८ व्या जन्मदिनी भेट म्हणून दिला - अश्व एक विलक्षण कोडे. इतकी वर्षे लोटली तरी अश्वही तसाच व पिताहि.

* ब्रम्हर्षी गौतमांनी काहीही सांगण्यास नकार दिला, ब्रम्हर्षी याज्ञवल्क्यांनी मंत्रगजर करण्यास फक्त मन हलवून संमती दिली, अहल्येचि माता पूर्णाहुतिने तर कडक  शब्दात, भलते धाडस न करण्यास बजावले होते फक्त महर्षि शशिभूषणांनी विचारांना अनुमोदन व कार्यासाठी आशीर्वाद दिले.

* महर्षि शशिभूषण म्हणाले - मी तुझ्यामध्ये माझेच प्रतिबिंब पाहत आहे. तू ज्या मार्गावरून चालू इच्छित आहेस, तो मार्ग सोपा नाही. तू प्रभू रामचंद्रांच्या  वनवासगमन मार्गाने जा, तुझा खरा मार्ग सापडेल.

* मंथरेला - घृणातिशयेला शोधायला निघाला. (ती कधी कुबुद्धि, कधी कुविद्येच्या रुपात सर्वत्र वावरत असते, कुणाचाही घात करण्याचे सामर्थ्य तिच्याकडे आहे.)

*  कुविद्या शिकण्याची व त्या सर्व कुविद्यांच्या विरुद्ध असणाऱ्या सिद्धी, शक्ती व अस्त्रे ह्यांचा अभ्यास करण्याची तळमळ.

* सिद्धयोगीकडे मातृप्रेम + पितृभक्ती होती आणि ह्यामुळेच ज्ञानगंजमध्ये प्रवेश मिळाला.

* पिता हा जीवनाचा अधिनायक ( hero) होता, आहे आणि राहील. मातेपेक्षा पिता अधिक प्रिय.

* पित्याचे व मातेचे कार्य व नाव यशस्वीपणे चालवण्यासाठी अफाट प्रयत्न.

* पित्यापासून काहीही लपवले नाही मात्र मातेपासून अर्ध्या गोष्टी लपविण्यास माता अहल्येनेच सहाय्य केले.

* माता कैकयीने एक थैली दिली. त्यात रामनामाची मुद्रिका + चिठ्ठी होती. ( ही रामनामाची मुद्रिका भगिनी सुमित्रेने माता कैकयीला दिली होती).

* ज्ञानगंज मध्ये प्रत्येकाने स्वागत केले - असंख्य ब्रम्हर्षी, सिद्ध, भक्त, परमभक्त, सिद्धयोगी, प्रेमयोगी.

* सिद्धयोगीने ज्ञानगंज मध्ये ९ वेळा प्रवास केला.

* प्रत्येक प्रवासात ९ पायऱ्या चढत राहिला. प्रत्येक पायरीवर एक सिद्धयोगी - काहीतरी शिकवीत होता.

* १ल्या खेपस ९ व्या पायरीवर असलेल्या सिद्धयोगीने एक मंत्र दिला व त्याच्या कूटीत नेऊन खूप काही शिकवले.

* 3ऱ्या ज्ञानगंज भेटी नंतर माता कैकयी व लक्ष्मण माता सुमित्रा, ब्रम्हर्षी वासिष्ठांकडे घेऊन गेल्या - वसिष्ठआश्रमात ( महर्षि पवित्रानंद यांचा आश्रम मेघपथ स्थानावरील - मेघनादशक्तीने लक्ष्मणास मूर्च्छित केलेले स्थान). महर्षि पवित्रानंदांनी विधिवत शिष्य करून घेतले, लक्ष्मणविद्या शिकवण्यासाठी. कार्य संपन्न होताच ही विद्या महर्षि पवित्रानंदांकडे परत जाईल.

* दरवर्षीच्या चातुर्मासात महर्षि पवित्रानंद, ७ वर्षे जिथे कुठे सिद्ध योगी असेल तिथे येऊन शिकवू लागले. नंतर दर वर्षी भेटणे होत राहिले. दरवर्षीच्या आषाढ पौर्णिमेला सिद्धयोगी महर्षि पवित्रानंदांना त्यांच्या आश्रमात भेटत आहे.

* एका आषाढयात्रेच्या वेळेस पत्नीवर व तिच्या बंधूवर जीवघेणा हल्ला झाला. ते थोडे बरे झाल्यावरच सिद्धयोगिने परत यात्रा सुरू केली.

* दुसऱ्या यात्रेच्या वेळेस, रथीसम्राज्ञी नर्मदादेवींची कन्या व पुत्र तसेच रथीसम्राट हृषिकेशनाथांची एकमेव प्रिय भगिनी अन्नपूर्णा देवी अकस्मात नाहीसे झाले होते.

* पित्याने व ब्रह्मवादिनी अहल्येने कायम एकच सांगितले की अन्नपूर्णेचा निरोप तिच्या मुद्रेसह आला की तो पाळायचाच.

* अन्नपूर्णाच सिद्धयोगीच्या लक्ष्मणविद्येच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकते.

* ८ व्या खेपेस ७२ व्या पायरीवर उभा असलेल्या सिद्धयोगीने मंत्रोपदेश, विद्योपदेश, तंत्रोपदेश, योगोपदेश आणि यज्ञोपदेश केला.

* ९ व्या खेपेस, ८१ व्या पायरीवर उभा असलेला सिद्धयोगी हा शिवाचा डमरू - शिवपुत्र - शिवदास - शिवसखा आहे.

* रामनामाचा स्पर्श हीच जिवंतपणाची एकमेव जाणीव

* शेवटच्या पायरी नंतर महाराज वासुकी व प्रत्यक्ष भगवान शिव दर्शन.

* अनेक ज्ञानगंजसिद्धी प्राप्त.

* धर्मलेखा ही विजयरुद्रांना  सुद्धा अनेक गोष्टी कळू देत नाही परंतु त्या गोष्टी सिद्धयोगीला ठाऊक असतात. धर्मलेखेला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतो, ते केवळ लक्ष्मण विद्येमुळे.

* स्वयंपूर्णादेवी व अन्नपूर्णादेवी यांना नीट ओळखतो. गेली १४ वर्षे ह्या दोघी सिद्ध्योगीला वारंवार भेटत असतात. त्यांच्या सारखीच असणारी तिसरी सदैव त्याच्या बरोबरच असते.

* बद्रीनाथ क्षेत्रामधील धर्मस्थानावर ठेवलेल्या केशवादित्य व अन्वयेचा संरक्षक

* पाण्यातही श्वास घेऊ शकतो.

* अन्नपूर्णेचा सिद्धयोगीवर असीम विश्वास आहे व आशीर्वादही


# सिद्धयोगी

* अवघ्या 2 शस्त्रांनी झाखिणी ( दनुकन्या / प्रतीदनु) व दनुला पळवून लावले. 

* ब्रम्हर्षी वसिष्ठ यांच्या आज्ञेशिवाय सिद्धध्यान लावत नाही.

* चरंग ग्रामातील काश रायच्या ( आकाशकुक्ष) प्रसदमध्ये : 

      √ धर्म लेखेचा हात तिच्याही नकळत सिद्धयोगी साठी आशीर्वादासाठी उंचावला.

      √ सिद्धयोगी व विजयादेवींनी मिळून धर्मलेखेस हातावर उचलून वरच्या मजल्यावर नेले

      √ सिद्धयोगीचा भाला सर्कीच्या ( Sathadorina - शतकालकुटा छातीत रुतुन बसला, भीषण किंचाळी ठोकत ती पळून गेली.

      √ पित्याचा प्रमुख आदेश - पाहिले ते सावधपण

      √ सिद्धयोगीलाजवळ घेत धर्मलेखा म्हणते - तू कधीच चूक केलेली नाहीस आणि आजही नाही.

* ' रणधीर रूद्र विजय ' ग्रंथ वाचला आहे.


COMPILATION  - Jayashriveera Panchbhai


🌸कथामंजिरी ३/९१🌸

ज्ञानगंज ( सिद्ध भूमी)

सनातन पवित्र धर्म आणि अपवित्र निशाचर तंज्ञमार्ग.हे एकाच चुंबकाच्या दोन ध्रुवांप्रमाणे
(Poles) आहेत.
व हयाचे शिक्षण व उपदेश  ज्ञानगंजमध्ये
व्यवस्थित शिकल्यावरच त्या दोन ध्रुवांच्या बरोबर मध्यावर असणारा एक वेगळाच महामार्ग प्राप्त होतो.

३/१०९

🌑अज्ञान गंज -अंध:कारगंज (दुर्गतिभूमी)🌑

ह्या विश्वात जसे ज्ञानगंज आहे तसे अज्ञानगंजही आहे.
कंटकेच्या कानात अज्ञानगंजच सांगत होता
- होय! ही खरीखुरी धर्मलेखा आहे.


Compilation : Mohiniveera Kurhekar


Saturday 9 March 2024

Vijayrudra Family Tree

Km 3 95 
विजयादेवी शिवप्रशांत कुक्ष  यांच्या माता आहेत आणि ब्रह्मानंदरुद्र यांच्या भगिनी आहेत ।

Last updated on 1 Feb 2024


Friday 8 March 2024

महर्षि पवित्रानंद ( ऋषि कल्मषपाद) Pavitranand Family Tree

 

Pavitranand Family Tree


🌄 महर्षि पवित्रानंद Ref.kathamanjiri 3/92


ब्रह्मर्षि वसिष्ठ

⬇️

वंशज 

महर्षि पवित्रानंद.

( कल्मषपाद)


कल्मषपाद हे नाव ऋषिवर्यांनी मुद्दाम धारण केलेले आहे.


ह्या नावाने त्यांनी सर्व कुविद्या,तसेच सर्व तंत्रविद्या शिकून घेतल्या व  सनातन धर्मियांसाठी अनेक पवित्र गोष्टी तयार करुन ठेवल्या.


ते फक्त चातुर्मासात वसिष्ठ आश्रमात येऊन राहतात.बाकीचे आठही महिने ते सनातनधर्मियांचे

रक्षण करण्यासाठी अगदी सर्वत्र फिरत राहतात.


ह्यांची पत्नी महामति इरावती ही सुद्धा ह्यांच्याइतकीच सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण आहे.

ह्या दोघांनाही त्यांच्या धाडसी उपक्रमामध्ये स्वतः

गुरु वसिष्ठांनीच सहाय्य केले होते


हेच सरस्वतीदेवीचे पिता व माता आहेत.ह्यांना एकूण ११अपत्ये आहेत.


त्यातील चार म्हणजे

१) सरस्वतीदेवी

२) रामप्रसाद शर्मा

३) शिवप्रसाद शर्मा

४) शिवप्रियादेवी


ही सर्व अपत्ये ह्यांच्याकडे कमीतकमी  तीन सामर्थ्यांनी युक्त आहेत.ह्यांच्या ११ अपत्यांनी,

ऋषियान साम्राज्यासह भारतवर्षातील नऊही 

साम्रांज्र्यांशी निकटचे आप्त संबंध केलेले आहेत.

व ते सतत कार्य करतच असतात.


मेघनादाने स्थापन केलेल्या ' मेघपथ' ह्या स्थानावरच महर्षि पवित्रानंदांनी त्यांचा आश्रम सुरु केला होता व त्याबरोबर गुरु वसिष्ठांनी त्या आश्रमास आपलाच एक आश्रम म्हणून घोषित केले.


COMPILATION: Mohiniveera Kurhekar

Tuesday 5 March 2024

How reading Katha Manjiri and Agralekh are beneficial for us.

 हरिः ॐ

1.  कथामंजिरी  १/२/३..base हा वैश्विक ईतिहासाशी निगडित आहे.

कथामंजिरी २ ही गुरुनाम, गुरूपादुका,'मंत्रगजर' महात्म्य यांनी ओतप्रोत भरलेले आहे ..

कथामंजिरी ३ ही परत गोष्टीरुप असून, वैश्विक ईतिहासाला जोडलेली आहे..

2.  कोणताही अग्रलेख हा आपल्याला दिवसभर positive vibrations देत रहातो.

बापुंबरोबर संवाद साधत रहातो....जे बापुला अपेक्षित असते....( भक्तीभाव चैतन्य संवादात जे आपण ऐकतो.....'त्याच्याशी बोलत रहा'..'आपले बोलणे त्याला आवडत असते'...)

3.  'आपल्याला फायदा हा कशापध्दतीने होऊ शकेल'?...हा बापूचा मार्ग ! 'माझे बाबा त्यांचा अमूल्य वेळ खर्च करुन हे लिहीतोय ना आपल्यासाठी मग ते वाचायचच...जो भाग समजेल ती बापूची ईच्छा आणि जो भाग नाही समजू शकणार त्यावर विचार करायला लावणे हीपण बापुचीच ईच्छा....

4.  तुलसीपत्र 1640 मध्ये - देवर्षी नारदांनी आणि कांचनवर्मा यांनी कथामंजिरी बद्दल उत्कृष्टरित्या समजून सांगितले आहे.

5.  या व्यतिरिक्त, कथामंजिरी द्वारे मी काय अनुभवत आहे, सक्रिय ऑनलाइन उपस्थिती (सहभागी) होऊन , सखोल विचार आणि या चर्चांद्वारे विविध दृष्टिकोन स्वीकारणे, नोट्स बनवण्याचे महत्त्व इ. कळून येते

6.  कथामंजिरी सोबत राहणे म्हणजे एक आनंद देणारी उपासनाच आहे. बापूंच्या सोबत राहण्याची एक उचित संधी आहे. मज्जाच मज्जा. लहान मुलांना कशी आज्जी गोष्ट सांगते व मुले कान देऊन व उत्सुकतेने कथा ऐकतात. एन्जॉय करतात. तसेच आपण बापू सांगतील ती कथा उत्सुकतेने ऐकतो व एन्जॉय करतो.

7.  अग्रलेख एक असून सुद्धा - जितके श्रद्धावान कथा मंजिरी वाचत आहेत ना तितके भाव दृष्टीकोण पॉईंट बापू तयार करून घेतात  (प्रत्येकाच्या हृदयात, बुद्धीत, मनात, चित्तात व त्याच्या जगात ) 

8.  अग्रलेख वाचणे म्हणजे बापूंचे शब्द ऐकणे. बापू सोबत बोलण अग्रलेखाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो . खूप सुंदर लेख आहेत. त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. बुद्धीला चालना मिळते. असे वाटते प्रत्येक अग्रलेख समीर दादां बरोबर बसुन समजून घ्यावे. पुन्हा नव्याने ह्या गोड शाळेत प्रवेश घ्यावा. काय गोड गुरूची  शाळा

9.  कथामंजिरी, वरुन समजते की आपल जीवन फार इज़ी आहे. त्या सर्वानी किती त्याग, त्रास आणी बरेच काही सहन केले. आपल्याला थोडे तरी त्यांच्या कडून शिकता आले पाहीजे.

•  मंत्र्गजर..भक्ती.

•  विश्वास.

•  धर्मलेखा व विजयरुद्रंचे प्रेम.

•  केशवदीतयचा विश्वास..

•  आंनदरूद्र ची नित्य उपासना.

•  आणी बरेच काही.

•  विविध मंत्राची ताकद.

•  त्रिविक्रमा वरिल खुप खुप प्रेम,भक्ती,विश्वास आणी सर्वस्व.

10.  यासोबत कथामंजिरी बद्दल म्हणाल तर, बापूची कोणतीही गोष्ट ही 'फायदा- तोट्याच्या' पार पलिकडे असते....त्याच्या बाळांच्या  विकासासाठी असते...जी त्याच्या कळकळीतून आणि तळमळीतून दिसून येते...'अकारण कारुण्य आणि लाभेविण प्रेम'. जे 'श्रीसाईसत्चरित्रातही'  ठायी ठायी दिसत. (सद्गुरुतत्त्वाच्या 'लीला' समजणे अत्यंत कठीण.)

11.  कथामंजिरी का वाचायची म्हणजे आईच दूध का प्यायच विचारण्या सारख आहे. आईच्या दूध.. शरीराला कसे पोषक असत. त्याने काय काय फायदा होतो. हे विचारत बसत का बाळ.? दूधातले ingredients त्या मागील science माहीत असत का?..की माहीत करुन घेईन मगच पिईन ..अस म्हणत का बाळ.?....नाही ...तसेच आम्हा श्रद्धावानचे,  बापू रुपी आई कथामंजिरीद्वारे (दुधाद्वारे) श्रद्धावानस काय काय देते हे अनुभवने महत्वाचं .. कधी एकदा तर .. अशी स्थिती होते ..अरे आज पेपरवाल्याने प्रत्यक्ष टाकला नाही .. आणि नेमका "मंगलवार" .. अरे यार ! Pls फक्त अग्रलेख मिस झालाय ही रुखरुख राहते, तरी यावर ही उपाय करून दिला बापूनि हिंदी अग्रलेख देऊन !!... अशी आमच्या सारखी,  अगदी तशीच स्थिती अग्रलेख वाचणार् या आम्हा प्रत्येकाची होत असते. सरतेशेवटी कथामंजिरी म्हणजे वाघिणीचे दूधच, म्हणून आम्ही श्रद्धावान कथामंजिरी वाचतो.


तू धेनू मी वासरु

तू माय मी लेकरु

पाजी  "कथामंजिरी" प्रेम पान्हू अनिरुद्धे ...


हरी ओम | श्रीराम | अंबज्ञ | नाथसंविध्


Discussion : Agralekh Discussion group Shraddhawan 

Compilation : Harshaveera Chavan

Friday 1 March 2024

TULSIPATRA 1108 IMP POINTS

 🏹 हर्क्यूलिस🏹


तुलसीपत्र ११०८


संपूर्ण नि:स्वार्थी वृत्ती,अत्यंत देखणा असूनही

निग्रहाने पाळलेले ब्रह्मचर्य, 'पावित्र्य हेच प्रमाण'

हा एकमेव निकष, मातृधर्म व मातृभूमीवरील आत्यंतिक निष्ठा व त्याचा सतत चाललेला महादुर्गेचा मनोमन जप ह्यामुळे त्याला शरीरात

असतानाच त्रिविक्रमाने दिव्यत्व बहाल केले आहे.

आज तो मानव असूनही पूर्णपणे दिव्य कोटीतील आहे.


🌷ॲफ्रोडाईट🌷

 तुलसीपत्र ११०८


ॲफ्रोडाईट ही त्रिविक्रमाने मानवांच्या

सहाय्यासाठी उत्पन्न केलेली 'अरुला' नामक शक्ती आहे.व चण्डिकाकुलाच्या न्यायाने ती त्रिविक्रमाची

सख्खी जन्मजात भगिनीच आहे.मानवी मनातील श्रद्धा हे तिचे मूलतत्त्व आहे व मानवाच्या सद्गुणांना विकसित करत राहणे व त्यासाठी 

मानवांना त्यांच्या त्यांच्या पवित्र कार्यक्षेत्रांमध्ये

सदैव प्रेरित व आकर्षित करीत राहणे,हेच तिचे

सहजकार्य आहे.परंतु तिच्याकडील ह्या आकर्षण शक्तीमुळेच सर्व दुर्जनांना तिची हाव असते.व हा मोठा अडथळा तिच्या कार्यात सतत येत राहतो.


जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम ।

तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम।


तुलसीपत्र ११०८

बिजाॅयमलानाला डेमेटरने सांगितले 

ते असे,

⬇️

श्रद्धेला सदासर्वकाळ सहाय करतो,तो 'श्रद्धावानांच्या मनातील अनन्यभाव'.


आणि असा अनन्यभाव प्रिय हर्क्यूलिसच्या

मनामध्ये दैवी स्तरावर त्रिविक्रमाच्या चरणी 

आहे.व मानवी स्तरावर त्यांचे तसेच अनन्यप्रेम

ॲफ्रोडाईटवर आहे.परंतु ॲफ्रोडाईटचे दिव्यत्व

लक्षात घेऊन त्याने कधीदेखील आपली मर्यादा

सोडली नाही.अंतराळात युद्ध करताना त्रिविक्रमावर

अनन्यश्रद्धा ठेवून ॲफ्रोडाईटच्या कार्यासाठी जे भीषण साहस केले,त्याक्षणी हर्क्यूलिसची श्रद्धा व हर्क्यूलिसचे प्रेम आपोआप एकरूप झाले व

सदैव सर्व जाणणाऱ्या  महादुर्गेने

हर्क्यूलिसच्या अस्तित्वाला दिव्यत्व बहाल केले.

म्हणून तो पूर्णपणे 'मानव' कोटीतीलही आहे 

आणि 'दिव्य' कोटीतीलही.


डेमेटर बिजाॅयमलानाला सांगते,


हर्क्यूलिस हा देवत्व कधीच स्वीकारणार नाही.

कारण त्याला सदैव त्रिविक्रमाचा अत्यंत प्रिय

भक्त व मित्र म्हणून रहायचे आहे.तो एकमेव आहे व

एकमेव असेल.कारण तो दिव्य मानवही नव्हे तर

मानवी देहातील 'दिव्य भाव' आहे व असेल.


COMPILATION: Mohiniveera Kurhekar

शंबलानगरी

 शंबलानगरी

🍃तुलसीपत्र १२३९


ॲब्रॅक्ससने ॲगार्था नगरीचा विकास घडवून आणताच, तिच्याच विरुद्ध टोकाला त्रिविक्रमाने

शंबलानगरीची स्थापना केलेली आहे.


ह्या नगरीची सम्राज्ञी आहे 'अमृतमोहिनी.'

हिलाच त्रेतायुगात शांतला नावाने ओळखले जाते.

द्वापारयुगात 'याज्ञसेनी' म्हणून ओळखली जाते.

आणि कलियुगात ' सुभद्रा' म्हणून ओळखली जाते.