Showing posts with label Mohiniveera. Show all posts
Showing posts with label Mohiniveera. Show all posts

Tuesday, September 23, 2025

शांभवी विद्या ( Shambhavi Vidya ) Sadvidya (Agralekh Group Discussion Points)

 १९) शांभवी विद्या 

शांभवी विद्या


तुलसीपत्र १३७४-१३७६

(इतर सद्विद्या बद्दल वाचण्यासाठी येथे क्लीक करा .)

शांभवी विद्या ही ह्या विश्वातील श्रीविद्येची

सर्वश्रेष्ठ देणगी आहे.


ही विद्या म्हणजे

ह्या विश्वातील कुठल्याही पदार्थांचे, ऊर्जास्त्रोताचे ,ऊर्जासमूहांचे,मानवी मनाचे,

श्रद्धावानांच्या बुद्धीचे खऱ्याखुऱ्या श्रद्धावानाच्या संपूर्ण जीवनाचे अगदी टोकाचे परिवर्तन घडवून आणणारी आदिमातेची सर्वात मोठी देणगी आहे.


शांभवी विद्या👉 ही कधीच खंडित होत नसते.ती भागाभागात शिकता येत नाही किंवा तुकड्यातुकड्याने थोडीथोडी ग्रहण 

करता येत नाही.


ह्या विद्येच्या एकूण १८ कक्षा आहेत.ह्यातील १६ कक्षा शिवगणांना व ऋषिकुमारांना जाणवतात.

पण १७ वी व १८ वी कक्षा मात्र अनुक्रमे

त्रिविक्रमाच्याव महादुर्गेच्या कृपेनेच प्राप्त होते.


आणि ह्या दोन कक्षा प्राप्त करून घेणे हेच

मानवी जन्माचे सर्वोच्च ध्येय असते.

ह्या १८ कक्षा म्हणजे शांभवी विद्येच्या १८

पायऱ्या आहेत.


शांभवी विद्या व श्रीविद्या कधी एकरूप असतात, तर कधी वेगवेगळ्या; व त्याचे कारणही एकच,

श्रद्धावानांना त्या सोप्या व्हाव्यात म्हणून.


श्रीविद्येशिवाय शांभवी विद्या नाही व शांभवीविद्येशिवाय श्रीविद्याही नाही.


थोडक्यात शांभवी विद्या म्हणजे त्रिपुरासुराचा वध कसा होतो हे शिकवणारी विद्या.


आणि हा त्रिपुरासुर म्हणजे तारका सुरांचे तीन पुत्र म्हणजेच मानवाने केलेल्या कर्मस्वातंत्र्याच्या  दुरुपयोगाचे तीन परिणाम.


विद्युन्माली म्हणजे भावापराध

कमलाक्ष म्हणजे प्रज्ञापराध

तारकाक्ष म्हणजे न्यायापराध.


ह्या तीन्हीं प्रकारच्या अपराधांचे एकत्रित 

व्यक्तिमत्त्व म्हणजे त्रिपुरासुर.


जेव्हा मानवाला पूर्ण पश्चात्ताप होऊन तो आदिमातेस व त्रिविक्रमास मन:पूर्वक शरण 

जातो,तेव्हाच त्रिशूळ धारण करणाऱ्या परमशिवाला आदिमाता त्या त्रिपुरासुराचा

वध करण्याची आज्ञा देते.


आणि ह्या त्रिपुरासुराचा वध कसा होतो ही विद्या म्हणजेच,

             👇

🌷शांभवी विद्या🌷


आणि हे शिकवण्यासाठी अध्यापिका आहे 

ब्रह्मवादिनी लोपामुद्रा .


कर्मस्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊच नये ह्या साठीचा एकमेव मार्ग  म्हणजे कर्मस्वातंत्र्याचे  स्तंभन करवून घेणे.

व  कर्मस्वातंत्र्याचे स्तंभन करण्याचा अधिकार आदिमाता अनसूयेने माता शिवगंगागौरीकडे सोपविलेला आहे.


नितांत पश्चात्ताप होऊन शरण गेलेल्या 

श्रद्धावानांसाठी, आदिमातेची क्षमा व त्रिविक्रमाचे अकारण कारुण्य दैवी पवित्र आधार तयार करीत राहते.ते दैवी पवित्र आधार वापरण्यास शिकण्याची कला अर्थात् मार्ग म्हणजेच,


🛎 शांभवी विद्या.🛎


ह्याची एकमेव गुरु केवळ ही आदिमाता

स्वतःच आहे.


आदिमातेची सर्जनशक्ती,नवनिर्मितीची शक्ती जेवढी बलवान,तेवढीच हिची  तिने तयार केलेल्या कणापासून ब्रह्मांडापर्यंतच्या

प्रत्येक गोष्टीला सांभाळण्याची शक्तीही बलवान आणि तेवढीच ते सर्व नष्ट करण्याची शक्तीही बलवान;
आणि ही तिची तीनही प्रकारची क्रिया
म्हणजेच
👇
❤️ शांभवी विद्या.❤️


इदं अनिरुद्धस्य!

श्रीराम! अंबज्ञ!नाथसंविध्!

Friday, December 20, 2024

स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय माणूस अपूर्ण आहे ( Discussion Notes )

 🌻कथा मंजिरी ४/१/२४


भगवंताची कृपा म्हणजे काय? 

सत्यप्रवेश चरण २७ मध्ये बापूंनी हे सविस्तर सांगितलेले आहे.


त्यावरून माझ्या अल्पबुद्धीला जे बापू कृपेने आकळले ते असे आहे.

👇

त्याच्या सहाय्याशिवाय म्हणजेच त्याच्या

कृपेशिवाय माणूस अपूर्ण आहे.

माणसाचे बळही अपूर्ण आहे आणि यश ही अपूर्ण आहे.


माणूस अपूर्ण आहे, हे आपण अनुभवू शकतो.

अगदी प्रत्येक सत्कर्म करताना त्याच्या अधिष्ठानाने केलेले कर्म व त्याला न स्मरता केलेले कर्म ह्यांच्या

यशात  किती तफावत असते ते आपण रोजच्या दैनंदिन जीवनातसुद्धा अनुभवत असतो.परीक्षा देत असताना तर जास्तच अनुभव घेतलेला असतो.


त्याचे साहाय्य मिळणारच हा आधार

व तो माझा उद्धार करण्यास समर्थ‌ आहेच  हा आत्मविश्वास.हे दोन्ही त्या भक्ताकडे असणे म्हणजे

त्या भक्तावर त्याची कृपा असणे.


कारण भक्ताला त्याचा वाटणारा आधार व भक्ताचा आत्मविश्वास त्या स्वयंभगवानानेच दृढ केलेले असतात. स्वयंभगवानाची कृपा असल्यावरच त्या भक्ताला ह्या गोष्टी आकळतात.


पण ती कृपा त्या भक्ताला प्राप्त होण्यासाठी त्या भक्ताने उचित श्रम करून कर्म करत असताना

प्रेमाने त्या देवाधिदेवाला, त्या स्वयंभगवानाला ,

त्या पूर्णाला आठवले पाहिजे.व त्याच्या त्या क्रियेला समग्रत्व म्हणजे पूर्णत्व मिळावे अशी

त्याला प्रार्थना केली की त्या भक्ताला आधार म्हणजे साहाय्य मिळतेच व त्याचा स्वयंभगवानावरचा विश्वासही दृढ झालेला असतो त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढलेला असतो.


त्याला आठवणे म्हणजे  ते नामस्मरण असेल,भजन असेल,मन:पूर्वक पूजन असेल, गजर असेल .जे भक्ताला आवडेल ते पण त्यात प्रेमळ भाव पाहिजे.त्याची स्मृती ठेवणे म्हणजेच त्याला आठवणे .


हे त्याला प्रेमभावाने आठवणे, आपली गरज झाली पाहिजे. जशी लक्ष्मणरावांना झाली.

म्हणून लक्ष्मणराव म्हणाले, आपण सगळेजण देवघरात बसून शांतपणे गजर करु या.


श्रद्धावानांना म्हणजे आपल्याला आपल्या  देवाधिदेवाने बापूरायाने,एक शाश्वत ग्वाही दिलेली आहे व तो पुन्हा पुन्हा सांगत असतो,

मी तुला कधीच टाकणार नाही.

हाच श्रद्धावानांचा सर्वात मोठा आधार आहे असे मला वाटते.

माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.


माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.

तो सर्वसमर्थ आहे. हाच फक्त मला माझ्या पापांपासून मुक्ती देऊ शकतो, हा आत्मविश्वासही श्रद्धावानांकडे असतो.कारण त्याला वेळोवेळी मिळालेल्या त्यांच्या साहाय्यामुळे, त्याला मिळालेल्या अनुभवामुळे त्यांच्या विश्वासाचे रुपांतर आत्मविश्वासात झालेले असते.व त्यासाठीच कृपासिंधू मासिक वाचायचे असते.त्याने इतर श्रद्धावानांना दिलेले अनुभव वाचल्यावर आपल्यालाही हे साहाय्य मिळू शकते हा भाव हा विश्वास वाढायला लागतो.व त्याच्या संकटाच्या वेळी  तसेच साहाय्य त्याला मिळाल्यावर त्या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात झालेले असते.


म्हणजेच श्रद्धावानांकडे त्याची कृपा आहेच.

बापूंचा आधार व बापूंनी वाढवलेला आत्मविश्वास हीच श्रद्धावानावर त्याने केलेली  कृपा आहे.


माझा भगवंत पूर्ण आहे म्हणूनच  तो आधार देऊ शकतो व माझ्यात जे कमी आहे ते देण्यास तो एकमेव  समर्थ आहे हा श्रद्धावानांचा भाव असतो.

म्हणून ते जीवनात सफल होतात व त्यांचा बापू राया त्यांच्या जीवनाचा विकास घडवत असतो.


श्रद्धावानाने  त्याला एकच सांगायचे आहे की

देवाधिदेवा बापूराया,

तू माझ्या जीवनात माझा उद्धार करण्यासाठी जे काही ठरवले आहे  तसंच घडव .

त्याच्या आड मी जरी आलो तरी मला बाजूला सारून तुला हवं तसं तू मला घडव.


पूर्ण असलेल्या स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय 

त्याची प्रत्येक क्रिया त्याचे बळ व त्यांचे यश अपूर्णच असते.

म्हणजेच मानवाने त्याचे प्रत्येक कर्म पूर्ण असलेल्या स्वयंभगवानाच्या  अधिष्ठानानेच केलं पाहिजे तरच ते यशस्वी होते.जसे काशीनाथराव व गोजीबाईंचे कुटुंब करतात.


सत्यप्रवेश पान १८२ -१८३ मध्ये बापू सांगतात की,

👇

मानवी मनाने स्वतःच्या कर्मस्वातंत्र्याने उत्पन्न केलेली दारूण महाशक्ती म्हणजेच माया.

परमेश्वरी स्मृतीचा अभाव म्हणजे माया.

माया हीच स्वतः 'अ-भावातून' उत्पन्न होत असल्यामुळे ती माझ्या जीवनात फक्त अभावच उत्पन्न करू शकते.आम्ही मानव मात्र ह्या अभावजन्य मायेच्या सहाय्याने पूर्णता उत्पन्न करु पाहतो.

..... ही एकमेव गोष्ट अशक्यच नाही कां?

अभावातून पूर्णता कधी येते कां?


ह्याचाच अर्थ आमच्या जीवनात पूर्णता आणण्यासाठी आम्हाला त्या अस्तित्व असणाऱ्या,म्हणजेच भाव रुपाने असणाऱ्या परमेश्वराच्या स्मृतीचीच (श्रद्धेची) आवश्यकता आहे.

#######################


श्रीसाईसच्चरित

 सदैव संपूर्ण साई हा । ५०/२१


म्हणूनच संपूर्ण असलेल्या परमात्मा बापूंना आठवून सर्व कर्मे केली की त्याचा आधार अनुभवता येतो व आपल्या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात होते म्हणजेच आपला परमात्मा बापू वरचा  विश्वास परमात्मा बापूच  दृढ करतो.


त्याला आठवणे, त्याची स्मृती ठेवणे, म्हणजेच उठाउठी मंत्रगजर करणे व ही  देणगीही त्यानेच आपल्या बाळांना, श्रद्धावानांना दिलेली आहे.

Notes from 

Aniruddha's Agralekh Discussion Group (Telegram)

Thursday, October 26, 2023

शंभुनाथ यांचा तथाकथित मृत्यू आणि शोक : अन्वयाचे निरीक्षण आणि धर्मलेखा चे उत्तर .कथा मंजिरी 3-46 आणि 3-47

शंभुनाथ यांचा तथाकथित मृत्यू आणि शोक : अन्वयाचे निरीक्षण आणि धर्मलेखा चे उत्तर .

प्रश्न १) शालू बाईचे व सरोजिनीचे डोळे अगदी एकसारखे होते .


उत्तर : कारण सरोजिनी शालूबाईंची ( शालिनी देवींची) कन्या होती.

प्रश्न २) कोण कोणाला सांभाळते?

सुहास्यवदनादेवी सरोजिनीस अर्थात् शंभुनाथाच्या
पत्नीस सांभाळत आहेत की सरोजिनी सुहास्यवदनादेवीस सांभाळत आहेत?

उत्तर : सरोजिनी सुहास्यवदनादेवीस सांभाळत होती. कारण सरोजिनीचा पती शंभुनाथ जिवंत होता व  रामप्रसादांच्या रुपात तिथे उपस्थित होता.
कारण मृत देह रामप्रसाद शर्मांचा होता.व सुहास्यवदनादेवी रामप्रसादशर्मांची ( लक्ष्मणप्रसाद वर्मा) यांची कन्या होती.

आणि शिवप्रसाद शर्मा ( शिवप्रियादेवी) वत्सलादेवींना सांभाळत होते.कारण वत्सलेचा पिता गेलेला होता.व शिवप्रियादेवींचा सख्खा बंधू.

शिवप्रसाद शर्मा (भरत वर्मा) हे तीन वर्षांपूर्वीच
कुक्ष राजधानीत अल्पशा आजाराने निधन पावले होते.
ही गोष्ट गुप्त ठेवली होती.
शिवप्रियादेवींचे उघड वावरणे धोक्याचे झाले असते.
हे दोघे बहीण भाऊ एकसारखे दिसणारे होते.
शिवप्रियादेवींकडे ध्वनिविद्या असल्यामुळे
त्या कुणाही मनुष्याच्या आवाजात बोलू शकत होत्या.म्हणून शिवप्रियादेवींनी शिवप्रसाद शर्माचे
रूपं घेतले होते.

३)प्रश्न -शालूबाईंचे व भानुबाईंचे शोक त्यांच्या नात्यांच्या मानाने खूपच वेगळे होते.अतिम संस्काराच्या वेळेस मात्र शालूबाई शांत होत्या.

उत्तर: शालूबाई ही  शालिनीदेवी होती. सुजयादित्यांची द्वितीय पत्नी व विकटाची माता.
तिच्या मुलीचे सरोजिनीचे लग्न शंभुनाथांशी झाले होते. या नात्याने शंभुनाथ शालिनीदेवींचा जावई
होता.
त्यामुळे आधी तिला खरा शोक झाला होता.

पण धर्मलेखेने  मृत्यू रामप्रसाद शर्मांचा झाला आहे, हे सत्य सांगितल्यावर ती शांतपणे
कार्यात भाग घेऊ लागली.

भानुबाई तीर्थक्षेत्राला गेलेल्या आहेत असे सर्वांना
माहित असल्यामुळे गोदावरीदेवी भानुबाईचे रूप
घेऊन आल्या. कारण त्यांचे येणे आवश्यक होते.
कारण त्या मृत व्यक्तीबरोबर फार पूर्वीपासून कार्य करत होत्या.

त्यामुळे भानुबाईचा( गोदावरीदेवींचा) शोक वेगळा होता.

 संकलन : मोहिनीवीरा