Friday 12 April 2024

शुभात्रेयी

 🌻शुभात्रेयी🌻


कथामंजिरी ३/११७ व तुलसीपत्र १४९८

ह्या अग्रलेखात ब्रह्मवादिनी शुभात्रेयींचा उल्लेख आला आहे.


याज्ञवल्क्य सांगतात,मंत्रगजर चोरणे म्हणजे

दत्तात्रेयभगिनी शुभात्रेयीदेवींच्या पादुका चोरणे.


ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे भगवान अत्रि व भगवती अनसूया ह्यांची कनिष्ठ कन्या अर्थात् भगवान दत्तात्रेयांची सख्खी धाकटी बहीण.


ही दत्तात्रेय भगिनी सदैव माता-पित्याबरोबर राहून त्यांची सेवा करीत असते.व हिलाच स्वतः अनसूयेने त्रिविक्रमाची उपासना देण्याची प्रथम दीक्षा

सत्ययुगातच दिलेली आहे- जेव्हा वेद लिहिले जात होते.भगवान त्रिविक्रमाच्या भक्तांची काळजी घेणे 

हाच तिचा निर्धार आहे.


हिचा त्रिविक्रम कसा आहे हे तिच्याच शब्दांत,

⬇️

ज्याच्या मस्तकी राहती श्रीदत्त।

जगदंबा करी निवास ज्याच्या हृदयचित्तात

हनुमंत स्वतः आहे ज्याचे हस्त

असा असे हा एकमेव अद्वितीय त्रिविक्रम दत्त प्रदत्त।


ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे त्रिविक्रमाची माता

श्रीविद्या हिचे मानवी स्वरूप आणि म्हणून

शुभात्रेयी ही त्रिविक्रमाची माताच.


हिने मंत्रगजर सर्व श्रद्धावानांसाठी खुला केला.

ह्या दत्तात्रेय भगिनीस अर्थातच मृत्यूचे बंधन नाही.

काळाचे बंधन नाही.


परंतु तिने  स्वतःचे सर्व‌ तपोबळ तिच्या पादुकामध्ये ठेवून दिले आहे.

केवळ एकाच गोष्टीसाठी - श्रद्धावानाकडे पुण्य जराही नसले,तरीदेखील त्याला मंत्रगजर करता यावा म्हणून.


ह्या तिच्या पादुका हिमालयातील एका गुप्त स्थानावर सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत.कारण त्रिगुणात्मक त्रैमूर्ति भगवान दत्तात्रेयांच्या रचनेनुसार

जोपर्यंत ह्या पादुका अशुद्ध जलात विसर्जित होणार नाहीत,तोपर्यंत हा महामंत्र, हा मंत्रगजर

श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ बलस्थान असेल व ते

बलस्थानच ह्या दुष्ट परंपरेला चोरावयाचे आहे.

Monday 8 April 2024

संजीवनी विद्या

 

संजीवनी विद्या


ही संजीवनी विद्या महादुर्गेची शक्ती व त्रिविक्रमाची सिद्धी आहे.


ही विद्या फक्त शुक्राचार्यांच्याच ताब्यात राहिली.


ह्या विद्येवर बफोमेटलाच काय स्काली व अंकारालासुद्धा तिच्यावर ताबा मिळवता येणे

शक्य नाही.


शुक्राचार्यांच्या पहिल्या दोन्ही कन्या

दिती व दनु ह्या दोघींकडेही अल्प संजीवनी विद्या आहेच- खंडित अवयव नीट करण्यासाठी.


शुक्राचार्यांनी संजीवनीविद्येचा उपयोग करून वालीचे सहस्त्रार्जुनाने तोडलेले हात परत जोडून दिले होते.


शुक्राचार्यांकडे ही संजीवनी विद्या

किरातकालामध्ये ( किरातकाल ९) ब्रह्मर्षि वसिष्ठांच्या शापामुळे निष्क्रिय अवस्थेत होती.


Notes from - Aniruddha's Telegram Discussion Group


Thursday 4 April 2024

Tarini Vidya

 सद्विद्या नं ४४

तारिणीविद्या

तुलसीपत्र १३२०

Tarini Vidya


श्रीचण्डिकाकुलाशी सर्व अहंकार सोडून फक्त
भाबड्या भक्तिभावाने आचरण करणे व मन
श्रीचण्डिकाकुलाविषयी निर्विकल्प करणे-
ही एकच गोष्ट अगदी सामान्यातल्या सामान्य मानवापासून महर्षिपर्यंत प्रत्येकाने आपापल्या
कुवतीनुसार करणे,
ही एकमेव तारकशक्ती आहे, तारिणीविद्या आहे अर्थात् पश्यंतीवाणी आहे.
तारिणीविद्या म्हणजे,
स्वतःच स्वतःला श्रीचण्डिकाकुलाचा नि:संशय
व अविभाज्य घटक मानणे.
कोण म्हणून?
तुमचा इष्टदेवताचा पुत्र म्हणून किंवा कन्या म्हणून,
तसेच एकमेव अद्वितीय असणाऱ्या त्रिविक्रमाला
एका स्तरावर 'पिता':दुसऱ्या स्तरावर 'मित्र' व 
तिसऱ्या स्तरावर ' आपले अंतिम साध्य व ध्येय' मानणे.

Compilation : Mohiniveera Kurhekar